जळगांव जा.प्रतिनिधी:-
दिनांक १४ आक्टोबर रोजी जळगाव जामोद शहरातील प्रत्येक वार्डातील समस्या जाणून घेऊन नागरिकांशी चर्चा करून ( तब्बल २५ समस्यांचे) निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
व येत्या १० दिवसात जर मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जामोद च्या वतीने आमरण उपोषण अथवा कोणत्याही स्थळी तीव्र स्वरूपाचे आदोलान करण्यात येईल. व होणाऱ्या परिणाम प्रशासन जबाबदार राहील.
अश्या प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना देण्यात आले यावेळी तालुकाअध्यक्ष प्रमोद सपकाळ, शहराध्यक्ष अझहर देशमुख,शहर कार्याध्यक्ष सजय ढगे, तालुकाकार्याध्यक्ष महादेव भालतडक, जिल्हासरचिटणीस अड. संदीप उगले, बंडु पाटील, डॉ. प्रशांत दाभाडे युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे,युवक तालुकाअध्यक्ष अनुप महाले, अड.करीम खान, युवक शहर कार्याध्यक्ष सिद्धार्थ हेलोडे, संदीप ढगे, डिगाबर तिजारे, रोहित पवार, सतीश तायडे,गौरव पाटील, शत्रुघ्न कोकाटे,हरिदास कवळे, प्रमोद गई, राजू पुणे वाले, शालीग्राम ढोकणे, शुभम रोठे,राजू भाई,सदाशिव जाणे, बळीराम मानकर, आताऊल्ला खान, अमान खान, सलमान खान,शकील पिंजारी सह बहुसंख्य शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.