मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात ४जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत एकूण ४ ठार आणि 3 गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
प्रतिनिधी : विजय भदाणे
सध्या या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात आली. युध्दपातळीवर बचाव कार्य करत येथील वाहतूक लोणावळा शहरातून वळविण्यात आली. त्यामुळे दुतगती महार्गावर वाहतूकीची कोंडी झाली आहे.
यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. घटनेत 3 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे."