ता.पालम जिल्हा परभणी तालुक्यातील अतिवृष्टीच्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान, पंचनामे करा - JDM

JDM


Breaking

Thursday, October 20, 2022

ता.पालम जिल्हा परभणी तालुक्यातील अतिवृष्टीच्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान, पंचनामे करा


परभणी प्रतिनिधी
प्रकाशराज लालझरे
- भा.ज.पा.चे पालम तहसीलदार प्रतिभा गोरे यांना निवेदन 
पालम :- तालुक्यातील मागील काही दिवसांपासून सतत चा पाऊस व दि  17,18, ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचे तात्काळ पंचनामे करावीत, शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी पालम तालुका भाजपा च्या वतिने तालुका अध्यक्ष शिवाजीराव दिवटे यांच्या नेतृत्त्वाखाली पालम तहसीलदार प्रतिभा गोरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
पालम तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी विविध बॅंकांकडून पीक कर्ज घेतले तर काही शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज काढून शेतामध्ये पेरणी केली .शेतात सोयाबीन कापूस तूर यांच्यासह विविध पिकांच्या संगोपनासाठी रासायनिक खत पिकावर रोग नये म्हणून विविध किटकनाशकांची फवारणी केली आहे शेतातील पीक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च झाला असुन हातात आलेले सोयाबीन पीक परतीच्या पावसामुळे काढणी पश्चात नुकसानीत सापडेल आहे . त्यामुळे डॅमेज झाले आहे . तसेच कापसाचे बोंडाची नासाडी मोठ्या प्रमाणात झाली आहे त्यासाठी पालम तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून नुकसानभरपाई पोटी मदत मिळवून द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.या निवेदनावर भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव दिवटे , जिल्हा उपाध्यक्ष लिंबाजी टाले , तालुका सरचिटणीस भगवान करंजे, तालुका युवा अध्यक्ष नंदेश्वर बलोरे,पालम शहराध्यक्ष मधुकर रोकडे , तालुका उपाध्यक्ष सुरेश सोनटक्के, रुपेश शिनगारे, प्रल्हाद व्हंडाळे, नगरसेवक लक्ष्मण रोकडे, सोपान कराळे, आंनता कराळे, आनंद साखला, गोपिराज शिंदे, माऊली घोरपडे, सुजित मालेवर,राघु भैय्या दुधाटे, भास्कर कराळे, जोशी पालम,राम गावंडे, यांच्यासह भाजपाचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते..